ग्रामपंचायत विभाग

ग्रामपंचायत विभाग

ग्रामपंचायत विभाग हा जिल्‍हा परिषदे मध्‍ये असणा-या विभागां पैकी एक महत्‍वाचा विभाग आहे. ग्रामपंचायत विभागा अंतर्गत  निर्मल भारत अभियाण ही  योजना राबविली  जाते . तसेच विस्‍तार अधिकारी (पं) , विस्‍तार अधिकारी (सां.) , ग्रामविकास अधिकारी , व ग्रामसेवक संवर्गाच्‍या अस्‍थापना सांभाळल्‍या जातात.
ग्रामपंचायती स्वावलंबी होवून त्यांना स्वायत्त संस्थाप्रमाणे आपला कारभार करण्याचे सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून केंद्गशासनाने 73 वी घटना दुरूस्ती केली . त्यामुळे ग्रामपंचयतींना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे .अशा त-हेने ग्रामपंचयतीची वाटचाल गावातील लोकांना सामाजिक न्याय मिळावा आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा या दिशेने सुरू झाली आहे.
देशाचा सर्वागिंन विकास होण्यासाठी केंद्गशासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. विकास योजनाचा लाभ अगदी तळागाळातील माणसाला मिळावा व त्यांची उन्नती / प्रगती व्हावी यासाठी सत्तेचे विकेंद्गीकरण करून जिल्हा परिषद समित्या व ग्रामपंचायती यांना अधिकार देण्यात आले.
शासन विविध योजना राबवते या योजनांचा ख-या अर्थाने .लाभ होवून गरीब जनतेचे जीवन सुधारणे हा हेतू आहे. विविध शासकिय योजनांचा लाभ घेवून ग्रामीण लोकांचे राहणीमान उंचावणे ही शासनाची अपेक्षा आहे. अशा सर्व योजनांची माहिती जनतेपर्यत पोहचणे अत्यंत महत्वाचे आहे.